या नवीन निकषानुसार महिला ठरणारा अपात्र :-
ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या 2,30,000 पर्यंत आहे या महिला अपात्र ठरणार आहेत.
यामध्ये आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला पात्र होत्या परंतु आता झालेल्या पळतानुसार जवळजवळ 1,10,000 महिला 65 वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत.
ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 पर्यंत आहे.
फेब्रुवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2,00,000 आहे.
सरकारी कर्मचारी याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत या अशा 2,00,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत.
आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार यापुढे जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार द्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत. आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषांनुसार ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची केवायसी आणि याचबरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे.
आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार अपात्र ठरल्याने यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि याच बरोबर जो सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा 30 टक्के कपात झालेली आहे राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे आणि याच बरोबर सर्वात कमी लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेली आहेत या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा 30 ते 39 या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत.
नवीन निकषानुसार कोणत्या महिला अपात्र ठरणार?
आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची संख्या जवळजवळ 16.5 लाख इतकी आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले होते. अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हास्तरावर तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरून बाहेर काढण्यात येणार आहे याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे